देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये स्थान मिळालेल्या पृथ्वी शॉ याला न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-20 लढतीत खेळण्याची संधी मिळेल असे वाटत होते. सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने संघात एक बदल केल्याचेही म्हटले. त्यावेळी सर्वांना पृथ्वीचे संघात पुनरागम झाले असावे असे वाटले, परंतु युझवेंद्र चहल याच्या जागी उमरान मलिकला संधी देण्यात आल्याचे पांड्याने सांगितले आणि पृथ्थी शॉ पुन्हा बेंचवर बसवल्याचे स्पष्ट झाले.
न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात पृथ्वी शॉ याला स्थान देण्यात आले होते. जुलै 2021 ला पृथ्वी शॉ अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्ध एक तरी सामना खेळण्यासाठी मिळेल असे वाटत होते. परंतु तिन्ही लढतीत त्याला बेंचवर बसावे लागले.
विशेष म्हणजे एकीकडे सलामीवीर ईशान किशन टी-20 मध्ये फेल होत असतानाही त्याला सातत्याने संधी दिली जातेय, तर देशांतर्गत क्रिकेट गाजवून आलेल्या पृथ्वी शॉ याला डावलले जातेय. त्यामुळे नेटकरीही पृथ्वी शॉ याच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत. नेटकऱ्यांनी कर्णधार पांड्यालाही धारेवर धरले आहे. तिसऱ्या टी-20 लढतीवेळी ट्विटरवर पृथ्वी शॉ याचे नाव ट्रेंडमध्ये दिसून आले.
Sad for #PrithviShaw #INDvNZ … every time Indian cricket management to Prithvi shaw pic.twitter.com/gEVNt7asrZ
— Neelesh 🕊 (@theNilesh_) February 1, 2023
The sad era for Shaw continues!!!#tigerexch #PrithviShaw #indiacricket pic.twitter.com/mg7nTpCMKH
— Tigerexch (@tigerexch) February 1, 2023
They are making fun of Prithvi Shaw here nd nothing else… Really can’t understand what problems do management have with him..
— Ronny (@Ronny82076283) February 1, 2023
तिन्ही सामन्यात एकदाही मैदानात उतरण्याची संधी मिळाली नसली तरी पृथ्वी शॉमुळे टीम इंडियाच्या तीन फलंदाजांची डोकेदुखी वाढली आहे. ईशान किशन, शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. तिसऱ्या लढतीत ईशान किशन तर झटपट बाद झाला. संपूर्ण मालिकेत तो धावा जमवू शकलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढला असून आगामी मालिकेसाठी पृथ्वी याचा त्यांच्या जागी नक्कीच विचार होऊ शकतो.
दरम्यान, 23 वर्षीय पृथ्वी शॉ याने आतापर्यंत एकच आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला आहे. यात तो शून्यावर बाद झाला होता. तसेच हिंदुस्थानकडून आतापर्यंत तो 6 वन डे आणि 5 कसोटी खेळला आहे.