हा देश फक्त अदानींचा नाही, सर्वांचा! राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul-gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटले की, देश हा सर्वांचा आहे, फक्त 2 ते 3 निवडक लोकांचा नाही.

बेळगाव येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, ‘भारत जोडो या यात्रेने संदेश दिला की हा देश सर्वांचा आहे, निवडक 2 ते 3 लोकांचा नाही, अदानींचा नाही. हा देश शेतकरी, मजूर, गरीब आणि तरुणांचा आहे’.

त्यांनी पुढे त्यांनी कर्नाटकातील भाजपच्या बोम्मई सरकारला देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले केवळ तरुणच नाही तर राज्यातील सगळे लोक बोलतात की बोम्मई सरकार 40 टक्के कमिशनचे सरकार आहे. इथे कोणतंही काम करायचं असेल तर 40 टक्के दिल्याशिवाय होत नाही, असं लोकच सांगतात, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.