स्वयंपाकघर कसे असावे, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगते

घरातील देवघरानंतर स्वयंपाकघराला पवित्र स्थानी मानले जाते. आपण स्वयंपाकघराती अन्न शिजवतो. तेथील स्वच्छता पाळतो. नेहमीच स्वयंपाकघर नीटनेटके असावे, असा आपला कटाक्ष असतो शिवाय अनेक संसर्गजन्य आजार अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतात, म्हणून ते स्वच्छ ठेवण्याकडे विशेष लक्ष ठेवले जाते. वास्तुशास्त्रानुसार, कुटुंबाचे आरोग्य आणि नातेसंबंध अधिकाधिक घट्ट होतात. वास्तुशास्त्रानुसार, तुम्हाला घरात समृद्धता हवी असेल तर स्वयंपाकघरात कोणत्या वस्तू ठेवणे आवश्यक आहे, याविषयी जाणून घेऊया.

– स्वयंपाकघरात गॅस स्टोव्ह आणि सिंक योग्य ठिकाणी असावेत. ते योग्य ठिकाणी नसल्यास घरात भांडणे होण्याची शक्यता असते. गॅस स्टोव्ह किंवा सिंक कधीही एकाच रांगेत नसावे. दोन्हीही स्वयंपाकघरात वेगवेगळ्या कोपऱ्यात असावे. घरातील गॅस किंवा स्टोव्हची स्थिती कुटुंबातील शांततेवर परिणाम करत असते.

– स्वयंपाकघर कधीही पायऱ्यांजवळ नसावे, हा वास्तूदोष मानला जातो. यामुळे घरातील ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो.

– बेसिनच्या नळातून कधीही पाण्याची गळती होता कामा नये. नळातून सतत पाणी गळत राहिल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. स्वयंपाकघरात नेहमी स्वच्छता असावी. गलिच्छ स्वयंपाकघरात नकारात्मक ऊर्जा जमा होते.

– स्वयंपाकघरातील गॅस शेगडी दररोज स्वच्छ करा. वेळच्या वेळी गॅसवर किंवा स्टोव्हवर शिजवले जाते, तेव्हा त्यावर अन्न सांडते, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच गॅस स्वच्छ पुसून घेणे आवश्यक आहे. यासाठी गॅस स्टोव्ह दररोज स्वच्छ केला पाहिजे. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहायला मदत होते, शिवाय गॅस शेगडी दररोज साफ न करणे, हे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते.