विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरत इतिहास घडविला. मात्र 18 वर्षांच्या प्रतीक्षेला 18 तासांतच गालबोट लागले अन् बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर घाईगडबडीत झालेल्या ‘विजय यात्रे’त 11 जणांचा चेंगराचेंगरीत जीव गेला, तर अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेमुळे आरसीबी संघ सध्या मोठय़ा संकटात सापडला आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed