ठाण्यात गडकरी रंगायतन येथे शिवगर्जना मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निष्ठावंत आमदार भास्कर जाधव यांनी मिंधे गटावर जोरदार टीका केली. दिघे साहेबांनी मुलं गमावलेल्या एकनाथ शिंदे यांना दुःखातून बाहेर काढले, त्याच एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या मुलाला दुःखात ढकलले, असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला. तसेच भाजप एकनाथ शिंदे यांचे जयचंद राठोड केल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
आपल्या भाषणादरम्यान भास्कर जाधव यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटाची आठवणही करून दिली. आपली दोन लहान मुलं गमावल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते. धर्मवीर आनंद दिघे त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढतात आणि राजन विचारे यांना बोलावून घेतात. दिघे यांनी एकनाथ शिंदेंना दुःखातून बाहेर काढायचे असेल तर त्याला कामात गुंतवण्यासाठी सभागृह नेते पदावर बसवू असे सांगितले. राजन विचारे यांनी क्षणाचाही विचार न करता राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांना सभागृह नेतेपदी बसवले. दिघे साहेबांनी मुलं गमावलेल्या एकनाथ शिंदेंना दुःखातून बाहेर काढले, पण त्याच एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या मुलाला दुःखात ढकलले, असे भास्कर जाधव म्हणाले.
View this post on Instagram
एकनाथ शिंदे आणि माझे वैयक्तिक भांडण नाही. ही लढाई तत्त्वांची आहे. तत्त्वांच्या लढाईत सख्खा भाऊ जरी आला तरी त्याला सोडता कामा नये, असे धर्मशास्त्र सांगतात. आमची तत्त्वांची लढाई आहे, असेही जाधव पुढे म्हणाले.
फोटो बाळासाहेबांचा, अन म्हणतात ‘मी मोदींचा माणूस’
पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावर आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो असे गद्दार म्हणत होते. खोटा आव आणत होते. आम्हाला न्याय मिळाला. वा रे वा चोर तर चोर आणि वर शिरजोर. कोणत्या तोंडाने तुम्ही बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा फोटो लावता. पण दाओसला गेल्यावर म्हणता मी तर नरेंद्र मोदींचाच माणूस आहे. तिथे बाळासाहेबांचा माणूस नव्हते का? असा टोलाही जाधव यांनी लगावला. तसेच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा वडिलांसारखे असल्याचे विधान केले होते. यावरूनही जाधव यांनी फटकेबाजी केली.
View this post on Instagram