चंद्रपूरात धाबा येथे यात्रा महोत्सव, संत कोंडय्या महाराज यांची वार्षिक यात्रा

dhaba-yatra

महाराष्ट्र – तेलंगणातील आराध्य दैवत म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील संत परमंस कोंडय्या महाराज. महाराजांचा यात्रा महोत्सव सध्या ‘धाबा’ येथे सूरु आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे ‘अग्निकुंड प्रभावळ’.

श्रद्धेच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्याचे दाखले पुराणात सापडतात. या अग्नीपरीक्षेचा थरारक सोहळा धाबा येथे दरवर्षी आयोजित केला जातो. संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात लालबुंद निखाऱ्याने तूडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायाने चालत जातात. यंदाही हा सोहळा वयोवृद्ध, बालगोपालांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खणला जातो. त्या खड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. जळालेल्या लाकडाच्या तयार झालेल्या निखाऱ्यांची विधिवत पूजा केली जाते. आणि मग या निखाऱ्यावरून चालण्याच्या थरारक सोहळ्याला सूरवात होते. मध्यरात्री सुरू होणाऱ्या अग्निकुंड प्रभावळीचा सोहळा अग्नी शांत होईपर्यंत सुरू असतो. भक्तीचा हा अद्भूत सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्र – तेलंगणा – आंध्रप्रदेशातील भाविक गर्दी करत असतात.

1984 पासून या यात्रेचं आयोजन केलं जातं. समाजातील तळागाळातील व्यक्तीला महाराजांनी कार्य केलं होतं. पापक्षालनाच्या उद्देशाने भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येतात, अशी माहिती तुलसीदास शेगमवा महाराज यांनी दिली.