
‘झी 5’ने ‘ग्यारह ग्यारह’ या नव्या वेब सीरिजची घोषणा केली आहे. या सीरिजमध्ये क्रितिका कामरा, धैर्य कर्वा आणि राघव जुयल महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. ‘पगलेट’फेम उमेश बिश्त यांनी दिग्दर्शित केलेली आणि पूजा बॅनर्जी व संजय शेखर यांनी लिहिलेली ‘ग्यारह ग्यारह’ची गोष्ट तीन वेगवेगळ्या दशकांत घडते. त्यात रहस्य, विज्ञान आणि गूढता यांचा अफलातून मिलाफ साधण्यात आला आहे. एक प्रकारे हा फँटसी ड्रामा आहे.
पहिल्यांदाच झी 5 ने करण जोहरच्या धर्माटिक एंटरटेन्मेंट आणि सिख्या एंटरटेन्मेंट यांच्यासोबत वेब सीरिजची निर्मिती केली आहे.