
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाची तीव्रता वाढत आहे. मुंबईसह आसपासच्या भागाला शत्रूच्या हल्ल्याचा मोठा धोका आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आज 22 कोटी 50 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उच्चस्तरीय बैठकीत पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेमार्फत राज्यातील संपूर्ण सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, पण उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच वितरित करण्यात आला आहे. या निधीतून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल.
संवेदनशील विभागाला अधिकचा निधी
नागरी संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिह्यांना प्रत्येकी एक कोटी तर इतर जिह्यांना 50 लाख निधी वितरित केले आहे.
एका तासात निधी मंजूर करणार
याव्यतिरिक्त कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो एका तासात मंजूर करा, असे महत्त्वपूर्ण आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले.
मराठवाडय़ातील निधीचे वितरण
छत्रपती संभाजीनगर 50 लाख रुपये
जालना 50 लाख रुपये
बीड 50 लाख रुपये
धाराशीव 50 लाख रुपये
नांदेड 50 लाख रुपये
लातूर 50 लाख रुपये
परभणी 50 लाख रुपये
हिंगोली 50 लाख रुपये