
>> अस्मिता प्रदीप येंडे
अन्यायाने पिचलेल्या जनतेला ताठ कण्याने उभं करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे बाळकडू त्यांना पाजणारी जगावेगळी आई माँसाहेब जिजाऊ हे दृढनिश्चय, शौर्य, संघटनकौशल्य आणि समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरण होय.
जिजाऊ हे शिवरायांचे पहिले विद्यापीठ होते. त्यांच्या शिकवणुकीतून शिवराय कणखर, आदर्शवादी न्यायप्रिय राजा बनले. जिजाऊंनी शिवरायांच्या बालपणात त्यांच्यावर धर्म, स्वराज्य आणि न्यायाचे संस्कार घडवले. त्यांनी कठीण प्रसंगी किल्ल्यावरच राहून शिवरायांना धैर्य दिले. त्यांना लढायला आणि स्वराज्य निर्माण करायला मार्गदर्शन केले.
एका आईने ठरवलं तर ती काय करू शकते याची प्रचिती आपल्याला राजमाता जिजाऊंच्या चरित्रातून येते. डॉ. संजय गायकवाड लिखित ‘राजमाता जिजाऊ ही स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी अमरगाथा मराठी मनाला नवचैतन्याची भरारी देईल.
जिजाऊंनी त्यांच्या जीवनात आलेल्या प्रत्येक भूमिकेचं समर्थपणे निर्वहन केलं. नानाविध भूमिका त्यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडल्या. त्या भूमिका उज्ज्वल आणि प्रेरणादायक अशा उंचीवर नेऊन पोहोचवल्या. त्यामुळेच त्यांनाराष्ट्रमाता म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी स्वराज्याचा रथ आश्वासकपणे प्रगती करत होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हेच त्यांच्या जीवनाचं उद्धिष्ट होतं. स्वराज्य स्थापनेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
जिजाऊंचे हे योगदान खरोखरंच अपरंपार आहे. त्या स्वत लढायला, मरायला आणि मारायला मागेपुढे पाहत नाही हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. संपूर्ण भारताला स्फूर्ती आणि प्रेरणा देण्राया स्त्राrशक्तीच्या अग्रभागी राजमाता जिजाऊंचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेगेले आहे. प्रत्येक पिढीसाठी त्या धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी ठेऊन गेल्या आहेत.
राजमाता जिजाऊ
लेखक ः डॉ. संजय गायकवाड प्रकाशक ः साकेत प्रकाशन
पृष्ठे ः 144 किंमत ः 200 रु.