
लातूर जिल्हा आणि शहरात मागील महिनाभरापासून पावसाने जोर धरला आहे, तसेच वेगाचे वारे वाहत असल्याने अनेक दुर्घटना घडत आहेत.
अशातच शहरातील देशपांडे गल्ली नजीकच्या भागात असणारे 250 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड उन्मळून पडले असून तीन घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तहसीलदारांना संपर्क साधत महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्याची विनंती केली.
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.