उद्योगपतींचे कर्ज माफ मात्र, विद्यार्थ्यांसाठी पैसे नाहीत! नाना पटोलेंचा महायुतीवर हल्लाबोल

उद्योगपतींचं कर्ज माफ करता येतं, पण विद्यार्थ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत. विद्यमान सरकार हे आंधळं आणि बहिरं सरकार असल्याची खरमरीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर केली आहे.

नाना पटोले यांनी एक्स (ट्विटर)वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यात ते म्हणाले, उद्योगपतींचं कर्ज माफ करता येतं, पण विद्यार्थ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत. विद्यमान सरकार आंधळं आणि बहिरं सरकार आहे. त्यामुळे त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची जबाबदारी युवकांवर आहे. महाविकास आघाडीच्या काळात बेरोजगारी इतिहासजमा होईल आणि महाराष्ट्रातील युवक-युवतींना न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.