उद्धव ठाकरे किंवा ममतांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करावे, सत्यपाल मलिक यांचे मत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करावे, असे मत माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज व्यक्त केले. संधी मिळाल्यास इंडिया आघाडीचे नेतृत्व करायला मी तयार आहे, असे विधान ममतांनी केले होते. यावर आज मलिक यांनी भाष्य केले. इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी सर्वात लोकप्रिय, प्रभावशाली आणि सक्षम आहेत. या दोघांपैकी एकाकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व दिल्यास इंडिया आघाडी देशात यशस्वी होईल, असे मलिक यांनी नमूद केले.