गझल रंग- स्त्री-जाणिवा गझलेतून

>> साबीर सोलापुरी

एकेकाळी स्त्रीचं ‘चूल आणि मूल’ एवढंच कार्यक्षेत्र होतं. लहानपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या, वृद्धपणी पुत्राच्या धाकात राहून आयुष्य व्यतीत करणं हेच तिचं व्रत होतं. सामाजिक जाणिवांचा साधा स्पर्शही तिला होऊ न देण्याची पूर्ण खबरदारी जाणूनबुजून त्या काळी घेतली जात होती. सांगायचा मुद्दा असा की, कालची स्त्राी रूढी -परंपरेच्या शृंखलेत अडकलेली होती. परंतु आजची स्त्राr ही शिक्षण घेऊन मोठय़ा आत्मविश्वासाने वावरताना दिसते. स्त्रियांमध्ये काळानुरूप बदलण्याचं मोठं सामर्थ्य सामावलंय हेच यावरून सिद्ध होतं.

गझल हे भावभावनांच्या प्रकटीकरणाचं एक शक्तिशाली माध्यम आहे. परंतु गझल हा काव्य प्रकार सहजसाध्य नाही. त्याच्या आकृतिबंधाचा, तंत्राचा सर्व बारकाव्यांनिशी अभ्यास करावा लागतो. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ असा हा काव्य प्रकार आहे. आज स्त्राr गझलकारही मराठीत मोठय़ा संख्येने तंत्रशुद्ध गझला लिहू लागल्यात. त्यांनी सोसलेल्या, भोगलेल्या, अनुभवलेल्या सामाजिक जाणिवा त्यांच्या गझलांमधून प्रत्ययकारी शब्दांतून त्या मांडू लागल्या आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला गझलकारांचे शेर रसग्रहणासाठी घेणं औचित्यपूर्ण ठरेल.

महिला गझलकारांच्या गझलांमध्ये दुनियादारीचं आकलन आहे, जगणं समजून घेणं आहे. केवळ स्त्राr भूमिकेतून आकांडतांडव करून पुरुषांना हिणवण्याचा खटाटोप नाही. त्याच्या अभिव्यक्तीला स्त्राrच्या विविध भावरूप छटांची किनार आहे. मराठी गझलेच्या वाटचालीत महिला गझलकारांचेही मोठे योगदान आहे ही दुर्लक्षणीय बाब नाही. कालच्या स्त्रियांवर, त्यांच्या कर्तृत्वावर समाजाने बंधनं लादली होती.  त्यामुळे स्त्राr आखून दिलेल्या चाकोरीत जगत होती, वाटय़ाला आलेलं दुःख मूकपणे सोसत होती. परंतु शिक्षणामुळे, संविधानामुळे आजच्या स्त्रियांमध्ये जागृती आली. म्हणूनच आजच्या सावित्रीच्या लेकी सर्वच क्षेत्रांत आपल्या बुद्धिकौशल्याने दुनियेला दिपवून टाकण्याची लख्ख कामगिरी पार पाडत आहेत. त्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दिशा गवसल्याने आता बंडाची, उठावाची भाषा बोलू लागल्या आहेत. काळाच्या समोरही त्या आव्हान निर्माण करू लागल्या आहेत.

ही निर्भयता नाशिक येथे पार पडलेल्या तिसऱया अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ गझलकार संगीता जोशी यांच्या या शेरातून अभिव्यक्त होताना दिसून येते…

एकटी स्त्राी आजला रस्त्यात आली

कांकणे केलीत काळाच्या हवाली

स्त्रीने चार भिंतींतच आपलं आयुष्य कंठावं, घराबाहेर पडूच नये अशी तरतूद व्यवस्थेने करून ठेवली होती. घर अन् काबाडकष्ट या चक्रात अडकलेल्या स्त्रियांच्या अंगी असलेले कित्येक कलागुण बरबाद होऊन गेले. संसाराच्या ओझ्याखाली तिला दाबून ठेवल्यामुळे भावनिक, वैचारिक, बौद्धिक अशी सर्व तऱहेने तिची कुचंबणा झाली. भरारी घेण्यासाठी तिला मोकळं आकाश मिळू दिलं गेलं नाही. चोहीकडून तिची कोंडी करून ठेवण्यात आली होती. यावर आशा पांडे म्हणतात…

काय प्रश्न हा तुझा हारले कशास मी

धावलास तू जगी मी घरात राहिले

स्त्रीचं जगणं म्हणजे विस्तवाशी उभा खेळ मांडणं असतं. वेदनेला कवटाळण्यात, दुःखाला गोंजारण्यात, आसवं ढाळत बसण्यात फारसा अर्थ नसतो हे तिला पुरतं उमगतं. ही तिची सोशिकता असते. जगण्याशी केलेली तडजोड असते. सोसणं अंगवळणी पडलं की, हार पचवूनही हसता येतं. ही ताकद स्त्रियांच्या ठायी ओतप्रोत असते. मराठी साहित्यातील पहिल्या महिला बाल गझलकार शोभा तेलंग यांनी त्यांच्या शेरातून स्त्राr जीवनाच्या पराजयाची कहाणी मांडली आहे…

विस्तवाशी खेळले मी कालपावेतो जरी

आजला माझ्या सवे मी हारते आहेच ना!

मातेचं अंतकरण आकाशासारखं उत्तुंग असतं. तिची ममता सागरासारखी अथांग असते. उन्हाचं दुःख सोसतानाही ती मुलांसाठी सुखाची सावली होते. ती त्यांच्या चुका पोटात घेते. लेकरांना माफ करणं हाच त्या माऊलीचा धर्म असतो. ती विलक्षण सोशिक असते. घरादारासाठी तिला कितीतरी गोष्टींचा त्याग करत जगावं लागतं. परंतु याची ती कुठे वाच्यता नाही करत. लेकरांचे सर्व गुन्हे माफ करणं एवढंच त्या माऊलीला ठाऊक असतं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असतो. पनवेल येथे संपन्न झालेल्या अकराव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. फातिमा मुजावर यांचा शेर याच गोष्टीची साक्ष देतो…

सहाया ऊन्ह दुःखाचे सुखाची सावली झाले

चुकांना माफ करणारी अशी मी माऊली झाले

बाई असल्याचं अभिमानाने सांगणं हे आजच्या घडीला महत्त्वाचं आहे. बाईपणाचा गौरव जगाने करायलाच हवा. कारण कित्येक महापुरुषांची, युगकर्त्यांची मुळं तिच्या गर्भातूनच अंकुरली, फुलली. पुढे त्यांनी इतिहास घडविला. राजमाता जिजामाता यांनी महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा दिला. त्यामुळेच तर स्वराज्याची स्थापना होऊ शकली. संस्कारांनी आपल्या मुलांना घडविणाऱया मातांची कितीतरी उदाहरणं आहेत. बाईपणाचा रास्त अभिमान बाळगणाऱया अशा आदर्श माता समाजासाठी भूषणावह आहेत. सुनंदा शेळके यांनाही बाई असल्याचा अभिमान वाटतो…

अभिमानाने सांगत असते बाई आहे

युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे

कालच्या स्त्राrच्या तुलनेत आजची स्त्री अधिक कणखर आहे हे तिला पक्कं ठाऊक असलं तरी भूतकाळात सोसलेला जाच, जुलमाचा सल तिच्या मनात घर करून असतोच. जगण्याला सामोरं जाताना तिची पावलं आणखी दमदारपणे पडतात. गावात जे काही माझ्या वाटय़ाला आलं होतं ते मी मागचं सारं सोसून टाकलंय. आता मी वेदनेच्या अंगणाची पाहुणी अजिबात होऊ नाही शकत, असं ती धीटपणे सांगतेय, शेरातून मांडतेय. तिच्यातली कणखरता, तिची स्पष्टता बिनधोकपणे ती काळाच्या पटलावर नोंदवतेय. आता काळ बदललाय याची जाणीव काळालाही करून देतेय. आत्मभान जागृत झालं की, उषेची नवी पहाट दिसू लागते. नीता भिसे यांनी गाववाल्यांना नेमकी हीच जाणीव करून दिलीय…

वेदनांच्या अंगणाची पाहुणी नाहीच मीही

राहुनी गावात ह्या मी पाहिले मागेच होते!

आजची स्त्री शिकलीय, सुधारलीय, पुढारलीय. तरीही तिच्यावरील अन्याय, अत्याचारांची मालिका थांबलेली नाही. काळ कोणताही असो, स्त्राrवर अन्याय ठरलेलाच असतो. आजच्या काळात तर उमलण्यापूर्वीच कळी खुडली जाते. ही माणुसकीचीच हत्या असते. मुलगाच हवा या खुळचट अट्टहासातून हे दुष्टचक्र फिरतंय. न्याय मागायचा तर कुठे? धराही नाराज अन् आभाळ फाटलंय. कुठे म्हणून टाके घालणार? ज्योती बालिगा-राव यांनी महिलांवरील अत्याचार तसेच स्त्राrभ्रूण हत्या या दोन्ही घटनांकडं लक्ष वेधलंय…

मागुन मीही पाहिला दाही दिशांना आसरा

नाराजही होती धरा, आभाळ फाटले होते

राज्यघटनेने महिलांमध्ये आत्मसन्मानाची भावना रुजवली, त्यांच्यात स्वाभिमान जागवला. कणखर बाण्याने, ताठ मानेने कसं जगायचं हे शिकवलं. त्याचबरोबर त्यांना समानतेची जाणीव करून दिली. स्त्राr लाचार किंवा कमकुवत नाही, तर ती सक्षम आहे. अबला नाही, तर सबला आहे, हेही सांगितलं. म्हणूनच आजच्या स्त्रिया रोजच्या जगण्याच्या संघर्षात हार नाही मानत. नोकरी सांभाळूनही ती कुटुंबाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलते. अशी स्त्राrच घराचा मुलाधार असते. श्रम करण्याच्या मनोवृत्तीमुळे स्त्री सक्षम बनत गेली. ही तिची सक्षमता अनन्यसाधारण आहे. हा वेदनेचा प्रवास असला तरी त्याला उंची देणारा शेर डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी लिहिलाय…

खाल मानेने कुणाचा घेतला आधार नाही

वेदना उंची मनाची एवढी लाचार नाही

आशय, विषय अन् मांडणी या तिन्ही अंगांनी वरील शेर वेगळेपण दर्शवितात. अनुभव आशेचा असो वा निराशेचा, दुःखाचा असो वा आनंदाचा, त्यातील भाव उत्कटतेने प्रकट होत जातो. महिला गझलकारांनी गझलेतून आपल्या जाणिवा अभिव्यक्त करून मराठी गझलेचा परीघ विस्तीर्ण केलाय हे खरंय.

[email protected]