
मुखवास हा एक पारंपारिक हिंदुस्थानी आहाराचाच एक भाग म्हणायला हवा. मुखवास हा शतकानुशतके जेवणानंतर आपण खात आलोय. विविध बिया, मसाले आणि औषधी वनस्पतींपासून मुखवास बनवला जातो. मुखवास केवळ चवीलाच नाही तर, आरोग्यासाठीही तितकाच उपयुक्त आहे.
जेवणानंतर मुखवासाचे सर्वात महत्वाचे फायदे
मुखवास पचनास मदत करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरते. तसेच मुखवासात आढळणाऱ्या अनेक घटकांमध्ये, जसे की बडीशेप, ओवा, अळशी हे सर्व घटक पोटफुगी, गॅस आणि अपचन कमी करण्यास मदत करतात.
जेवणानंतर मुखवास खाण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे, श्वासाला ताजेपणा प्राप्त होतो. मुखवासमुळे आपल्या तोंडाचा दुर्गंध कमी होण्यास मदत होते. विशेषतः, बडीशेपमुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.
मुखवास श्वास ताजेतवाने करण्यासोबतच तोंडाचे आरोग्य सुधारण्यासही हातभार लावतो. मुखवासमुळे लाळेचे उत्पादन वाढविण्यास मदत होते. यामुळे तोंडातील आम्लता देखील मोठ्या प्रमाणावर कमी होते.
मुखवासमध्ये असलेले तीळ, सुके खोबरे यासारख्या घटकांमुळे हानिकारक जीवाणूंची वाढ रोखण्यास मदत होते. यामुळे हिरड्या आणि दात निरोगी राहतात.
मुखवास हा अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. यामुळे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत होते.
मुखवासातील फायबर पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते, त्यामुळे कमी खाल्ले जाते. मुखवासात असलेले अँटीऑक्सिडंट्स चयापचय वाढवतात, यामुळे जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.
मधुमेह असलेल्या लोकांमध्ये मुखवास रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. मुखवासात असलेले फायबर रक्तप्रवाहात साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता कमी होते.