
अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय171 च्या भीषण अपघातात तब्बल 275 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एअर इंडियाच्या सर्व वाईडबॉडी विमानांसाठी नव्या सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणा टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी केली आहे. विमान अपघात प्रकरणी त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून पीडितांच्या कुटुंबीयांसोबत टाटा समूह नेहमीच उभा राहील असे म्हटले आहे.
बोईंग 787-8 ड्रीमलाइनरची शेवटची सखोल तपासणी जून 2023 मध्ये झाली होती. तर पुढील तपासणी डिसेंबर 2025 मध्ये नियोजित होती. उजवे इंजिन मार्च 2025 मध्ये आणि डावे इंजिन एप्रिल 2025 मध्ये तपासले गेले. उड्डाणापूर्वी कोणतीही समस्या निदर्शनास आली नव्हती, असा दावाही चंद्रशेखरन यांनी केला आहे.