
20 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले होते. पण या मार्गावर फक्त खड्डेच आहेत. याच कारणामुळे भ्रष्टनाथ शिंदे यांनी पळ काढळा आणि वॉशिंग मशीन पार्टीत गेले अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच हे महाराष्ट्रातलं भाजप सरकार आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी या खड्ड्यांबाबतची एक बातमी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून म्हटले आहे की, मे महिन्यात हीच बाब मी सांगितली होती. समृद्धी हायवेवर फक्त खड्डेच खड्डे आहेत, कुठेही हा मार्ग सरळ नाही. याचमुळे भ्रष्टनाथ शिंदे यांनी पळ काढळा आणि वॉशिंग मशीन पार्टीत गेले. तसेच काही आठवड्यांपूर्वीच या मार्गाचे उद्घाटन झाले होते. हे आहे महाराष्ट्रातलं भाजप सरकार असेही आदित्य ठाकरे म्हणाले.