पर्यावरण – मगरींचे संवर्धन आवश्यक

>> प्रेमसागर मेस्त्री

मगरींना वाचवणे आवश्यक आहे. कारण उष्णकटिबंधातील अन्नसाखळीमध्ये मगरी महत्त्वाची भूमिका बजावतात. जशी ज्या जंगलात वाघांचा वावर असतो तेव्हा तिथली अन्नसाखळी सुस्थितीत असते तशीच ज्या ठिकाणी मगर आहे तिथली पाण्यातली अन्नसाखळीही उत्तम असते. जिथे मगर असते तिथे माशांची संख्या चांगली असते. जल पर्यावरण संस्थेमध्ये मगर हा प्राणी भक्षक किंवा शिकारी प्राणी आहे आणि त्याच्या असण्याने जलीय पर्यावरण आरोग्यदायी राहते. अशा मगर या प्राण्याविषयी प्रबोधन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. वन्यजीव संवर्धनाचे कार्य अखंडित करीत असलेल्या सिस्केप संस्थेला सहकार्य करण्यासाठी मगर संवर्धन प्रकल्प उभारण्यात वनविभाग विविध विषयांवर सहकार्याचे आश्वासन मगर संवर्धन प्रकल्प सोहळ्यात करण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पात्रालगत तसेच अनेक पाणतलावांमधून मगरींचा मोठय़ा प्रमाणावर वावर दिसून येतो. महाडमधील सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमावर अनेक वेळा मोठय़ा प्रमाणात मगरी विश्रांती घेत असताना निदर्शनास येतात. या मगरींना ‘मार्श क्रोकोडाइल’ तसेच ‘मगर’ या नावाने संबोधतात. या मगरी माणसावर हल्ला करीत नाहीत. तसेच इतर पाळीव प्राण्यांनादेखील इजा पोहोचवत नाहीत. गेल्या 28 वर्षांत मगरींचे संवर्धन व्हावे याकरिता सिस्केप महाड ही संस्था कार्यरत आहे. मगरीचा शास्त्राrय अभ्यास करणे, त्यांच्या अधिवासाची ठिकाणे शोधणे, त्यांच्यावर उद्भवणाऱया धोक्याची नोंद करणे तसेच पुराच्या वेळी व अन्य काही स्थलांतर केल्या कारणामुळे मगरी भरवस्तीत सापडतात. त्यांना पकडून पुन्हा नदीत सोडण्याचे ‘मगर रेस्क्यू टास्क’ ही संस्था हे कार्य गेले अनेक वर्षे रोहा वनविभाग महाड परिक्षेत्र कार्यालय वनविभाग यांच्या मदतीने करीत आली आहे. या सर्व कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाहतुकीसाठी वाहन, बचाव कार्य साहित्य, मगर पकडणे आणि त्याला सुरक्षित ठिकाणी बॅगिंग करून नेणे अशा अनेक कामासाठी आर्थिक मदत संस्था स्वखर्चाने तसेच समाजातील दानशूर व्यक्ती, कंपन्या यांच्या सहकार्याने करीत आली आहे. महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही आणि प्रीजीव स्पेशालिस्ट कंपनी याकरिता वेळोवेळी सहकार्य करीत आली आहे. परंतु कायमस्वरूपी आणि सातत्य ठेवून मगर संवर्धनाचा प्रकल्प दूरगामी स्वरूपात करण्याकरिता हे काम प्रभावीपणे समाजाभिमुख करणे काळाची गरज ओळखून कंपनीचे चेअरमन महेश बबानी (सीएमडी, प्रिव्ही प्रीजीव स्पेशालिस्ट कंपनी समूह) यांनी दूरगामी उपायोजनेसाठी मगर संवर्धन प्रकल्प अंतर्गत उपयोजना करण्याचे ठरविले. याकरिता 17 जून 2025 रोजी जागतिक मगर दिनानिमित्त शाळांमधून जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आला.

दिनांक 18 जून 2025 रोजी प्रिव्ही आणि प्रीजीव कंपनी सभागृहात मगर संवर्धन प्रकल्प उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शैलेंद्रकुमार जाधव (आयएफएस) उपवनसंरक्षक रोहा वनविभाग आणि त्यांचे सहकारी महाड वनपरिक्षेत्र वनक्षेत्रपाल आशिष पाटील (आरएफओ)हे उपस्थित होते. तर प्रिव्ही आणि प्रीजीव स्पेशालिस्ट कंपनीचे व्ही. पी. प्रोजेक्ट मॅनेजर विवेक म्हात्रे, एव्हीपी ऑपरेशन सलीम सिरखोत, सीनिअर जनरल मॅनेजर सस्तेनेबिलिटी प्रमुख नवीन एस. आर., जनरल मॅनेजर वर्क ओपी बालाजी वेंकटरामन आदी उपस्थित होते.

यावेळी कंपनीने केलेल्या मियांवाकी जंगलनिर्मिती, वृक्षारोपण, महाड शहर परिसरातील गावांमधून करत असलेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. बाबानी यांच्या मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष निसर्ग संवर्धन कार्य याविषयी महाड एमआयडीसी केंद्रस्थानी ठेवून 10 किमी परिसरात वन्यजीव संवर्धन प्रकल्पाचे कार्य हे ध्येय समोर ठेवून वाटचाल सुरू केल्याचे स्पष्ट केले.

मगर या उभयचर प्राण्याबद्दल गावांमधून भीती गैरसमज दूर करून त्याचे संवर्धन करण्यासाठी कंपनी सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सलीम सिरखोत यांनी प्रिव्ही स्पेशालिस्टचे प्रेसिडेंट आर. एस. राजन यांनी मगर संवर्धन तसेच कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट शाश्वत विकास संकल्पना उपस्थितांना समजून सांगितली. यावेळी  मगर रेस्क्यू ट्रेनिंग प्रोग्राम आणि त्यासाठी लागणारी सामुग्री याविषयी सेफ्टी टीम तयार करण्याचे आवाहन सिस्केप संस्थेस केले. तर प्रिव्ही आणि प्रीजीव स्पेशालिस्ट कंपनी यासाठी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.

रोहा वनविभाग आणि जिह्यातील विविध वन परिक्षेत्र उपक्रम तसेच गावागावांमधून सामाजिक वनीकरण काम, अतिधोक्यात आलेल्या वन्यजीव संवर्धनाचे कार्य अखंडित करीत असलेल्या सिस्केप संस्थेस सहकार्य करण्यासाठी मगर संवर्धन प्रकल्प उभारण्यात वनविभाग विविध विषयांवर प्रत्यक्ष सहकार्य करेल असे आश्वासन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शैलेंद्रकुमार जाधव (आयएफएस) यांनी दिले. महाड वनक्षेत्रपाल श्री आशिष पाटील यांनी मगरीचे शास्त्राrय प्रकार, संरक्षण कायदा आणि सुव्यवस्था यांच्याबद्दल समाजाभिमुख भूमिका स्पष्ट केली.

[email protected]

(लेखक रायगड जिल्हा, मानद वन्यजीव रक्षक आहेत.)