प्रामाणिक कार्यकर्त्यांची कदर केली नाही तर जेवढ्या जोराने वरती चालले आहात, तेवढ्याच वेगाने खाली आल्याशिवाय राहणार नाही, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केले आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.





























































