दहावी-बारावीच्या परीक्षेवर 25 भरारी पथकांची नजर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांवर 25 भरारी पथकांची नजर असणार आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने कॉपीमुक्त अभियान राबवण्यास कडक पावले उचलली असून परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात 24 भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

जिल्ह्यात बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी 52 केंद्रांवर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच दहावीची जिल्ह्यात अभियान कॉपीमुक्त लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 75 परीक्षा केंद्रांवर एकूण 37 हजार 579 विद्यार्थी बसणार आहेत. कॉपीमुक्त अभियानांतर्गत जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर एकूण 25 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची झडती घेतली जाणार असून प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

या सीसीटीव्ही प्रणालीचे थेट नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडे असणार आहे. कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास बैठक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन कठोर कारवाई करणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.