
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र-अपात्र झोपडीधारकांची प्राथमिक यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यात 228 झोपडीधारकांपैकी केवळ 101 झोपडीधारक मोफत घरांसाठी पात्र ठरले आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
”आज धारावी पुनर्विकासासंदर्भात जाहीर झालेल्या पहिल्या यादीत 505 झोपडीधारकांपैकी केवळ 101 झोपडीधारकांना पात्र ठरवलं गेलंय! म्हणजेच जवळपास 75% रहिवाशी अपात्र ठरलेयत! आम्ही सुरवातीपासून हाच प्रश्न विचारतोय, की अदानी समूह नेमका कुणाचा विकास करतंय? धारावीकरांचा की स्वतःचा? कदाचित मुंबईचं नाव ‘अदानीनगर‘ करण्याचा भाजपचा विचार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.