बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची अंमलबजावणी होत नाही, आरोग्य विभागाची कबुली

राज्यात बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेंतर्गत तीस हजार रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचे निश्चित झालेले असतानाही या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत मान्य केले.

राज्यात बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेच्या अंमलबजावणीबाबत लहू कानडे व अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या अपघात विमा योजनेंतर्गत रस्त्यात कुठेही अपघात झाल्यास अपघातग्रस्ताला पहिल्या 72 तासांत नजीकच्या शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचार देण्यात येणार असून त्यासाठी तीस हजार रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचे निश्चित झाले आहे, पण या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे फेब्रुवारी महिन्यात निदर्शनास आले आहे का, असा प्रश्न विचारला होता. ते आरोग्यमंत्र्यांनी मान्य केले आहे.