
बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन तरुणांना अज्ञातांनी मारणहाण केली. एवढचं नाही तर त्यांना “जय श्रीराम”च्या घोषणा देण्यास भाग पाडले, असा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. यासंदर्भात पीडित तरुणांनी बंगळुरू पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे.
जमीर असे या पीडित तरुणाचे नाव आहे. तो संपिगेहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेकॅनिक म्हणून काम करतो. पीडित मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार 22 जून रोजी संध्याकाळी साडे चारच्या दरम्यान अज्ञात लोकांच्या एका गटाने त्याच्यावर आणि त्याच्या एका मित्रावर हल्ला केला. या लोकांनी त्याच्याशी गैरवर्तन करत मारहाण केली.
तामीळनाडूच्या राज्यपालांनी विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायला लावल्या
या तरुणांनी हेगडेनगरमधील एजेबीजे ग्राउंडजवळ शौचासाठी त्याची कार थांबवली होती होती. तेव्हा पाच ते सहा अज्ञातांचा एक गट तिथे आला आणि आमच्यासोबत गैरवर्तन करू लागले. त्यांनी आम्हाला विचारले की रस्ता नसताना तुम्ही इथे का आलात? यानंतर त्यांनी माझा मित्र वसीमला मारहाण केली. मात्र, तो कसाबसा त्यांच्या तावडीतून निसटला, असे पीडित तरुणाने सांगितले.
वसीम त्यांच्या तावडीतून निसटल्याने त्यांनी मला काठ्यांनी मारायला सुरुवात केली. यावेळी ते मला “जय श्रीराम” बोलण्यास भाग पाडत होते, असे जमीरने पोलिसांना सांगितले. जमीरने केलेल्या आरोपांच्या आधारे संपिगेहल्ली पोलीस ठाण्यात FIR नोंदविली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.