
अनेकांना जेवणानंतर पोटात जडपणा, आम्लपित्त, छातीत जळजळ किंवा गॅसची समस्या भेडसावते. यामागील कारणे जास्त तळलेले अन्न खाणे, जेवल्यानंतर लगेच बसणे किंवा झोपणे किंवा अनियमित खाण्याच्या सवयी असू शकतात. गॅस झालाय असं वाटल्यावर सर्वसामान्य माणसं लगेचच औषधे घ्यायला सुरुवात करतात. परंतु तुम्हाला नैसर्गिक पद्धतीच्या माध्यमातून गॅसवर मात करायची असेल तर, एक खास पद्धत नक्की अवलंबून बघा.
अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला फक्त 5 ते 6 सेकंदात पोटातील गॅस किंवा आम्लतेपासून आराम मिळू शकतो. यासाठी जेव्हा तुम्हाला ही समस्या असेल तेव्हा बर्फाचे थंड पाणी प्या. किंवा काही सेकंद हे पाणी तोंडात धरा. तुम्ही काही सेकंदांसाठी तोंडात थंड पाणी धरता तेव्हा ते व्हॅगस नर्व्ह सक्रिय करते. व्हॅगस नर्व्ह ही आपल्या पचनसंस्थेशी जोडलेली एक महत्त्वाची नर्व्ह आहे. ही पोटातील आम्लाची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. जेव्हा ते सक्रिय होते, तेव्हा पोटातील आम्ल निष्क्रिय होऊ लागते आणि छातीत जळजळ, गॅस किंवा आम्ल रिफ्लक्स सारख्या लक्षणांपासून त्वरित आराम मिळतो.
या प्रक्रियेनंतर किमान 2-3 तास पोट रिकामे ठेवावे. जेणेकरुन आपल्या पचनसंस्थेला पूर्ण विश्रांती मिळते आणि पोटातील आम्ल पातळी नियंत्रित राहते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होते. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्याकारणाने, कोणत्याही दुष्परिणामांशिवाय त्वरित आराम तुम्हाला मिळवता येईल.