
सुरतमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात गुजरातच्या खऱया विकासाची पोलखोल झाली. 36 तासांत 400 मिमी इतका पाऊस झाला; परंतु या पावसात विकास पूर्णपणे वाहून गेला. सुरत शहर आणि जिह्यात रविवारी रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे अनेक गावे, रस्ते पाण्याखाली गेले. शहरांमध्ये रस्तोरस्ती छातीपर्यंत माणूस बुडेल इतके पाणी साचल्याचे चित्र होते.
सखल भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. सुरत सेंट्रल बसस्थानकावरून धावणाऱया एसटी बससेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचारी, नागरिक अडकून पडले. वाहतुकीचे साधनच बंद झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मोठय़ा संख्येने बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, गुजरातमधील एकूण 159 तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. तरीही या पावसात अनेक गावे पाण्याखाली गेली.
राज्यात पावसाचा जोर वाढणार
पुढील 48 तासांत राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे उरलीसुरली
विकासकामे वाचवण्यासाठी सुरतसह राज्यभरात अनेक शहरांमधील पालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. सुरत शहरात 13 इंच पाऊस झाला. मेंदरडा, आमीरगड, कलावड आणि पलसाणा येथेही पावसाने दाणादाण उडाल्याचे राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरने स्पष्ट केले आहे.