गडिंहग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प

रविवारी व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने हिरण्यकेशी नदीला पूर आला आहे. या नदीवरील भडगाव पुलावर पाणी आल्याने गडिंहग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक आज पहाटेपासून ठप्प झाली आहे. या नदीवरील इतर तीन बंधारेदेखील पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून होणारी वाहतूकदेखील बंद झाली आहे.

गडिंहग्लज-चंदगड राज्य मार्गावर भडगाव पूल आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा पूल हिरण्यकेशी नदीच्या पुरामुळे पाण्याखाली जातो. त्यामुळे गडिंहग्लज तालुक्याचा चंदगडशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटतो. आज पहाटे पाच वाजता भडगाव पुलावरदेखील पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीस बंद झाला. हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, निलजी, जरळी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.