लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, निलंगातील मठाच्या राम मंदिराची भिंत कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान लातूर मधील निलंगा येथे महादेव मंदिराच्या शेजारी असलेल्या श्री स्वामी समर्थ मठातील श्री राम मंदिर मंदिराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

श्री स्वामी समर्थ मठ हा समर्थ सांप्रदायाचा साधारणपणे 1650 च्या दरम्यान स्थापन झालेला मठ आहे. स्वतः समर्थ रामदास स्वामी हे निलंगा येथे आले होते व त्यांनी 32 शिराळा येथील त्यांचे शिष्य आनंद स्वामी यांची या मठाचे मठपती म्हणून नेमणूक केली होती.

कालौघात या मंदिरात जुन्या बांधकामाची बरेचदा दुरुस्ती झालेली असणार. मात्र अता सतत चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे राममंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील पाठीमागची म्हणजेच पश्चिमेची भींतीचा भाग कोसळला आहे.