देशात 18 हजार 200 हेक्टरवरील जंगल नष्ट

deforestation

जंगले ही फुप्फुसे असून ती वाचवली पाहिजेत, जास्तीत जास्त झाडे लावून ऑक्सिजन निर्माण करायला हवा, अशी जनजागृती करणाऱया मोदी सरकारला प्रत्यक्षात या जंगलांचे काहीच पडलेले नाही. जंगलांची जागा उद्योगपतींच्या घशात घालण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले असून 2024 मध्ये तब्बल 18 हजार 200 हेक्टरवरील जंगल नष्ट झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.