प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा 27 जूनपासून सुरू होणार; 9 दिवस चालणार सोहळा

जगन्नाथ रथयात्रा हा देशातील भव्य आणि आध्यात्मिक महत्त्व असणारा सोहळा आहे. दरवर्षी ओडिशातील जगन्नाथ पुरी शहरात हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा उत्सवात भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचे पुजना करून त्यांची रथातून मिरवणूक काढण्यात येते. आषाढ शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवसापासून ही रथयात्रा सुरू होते. यावर्षी 27 जूनरोजी रथयात्रा निघणार आहे.

हिंदू पंचागानुसार उदयतिथीप्रमाणे हा उत्सव 27 जून रोजी रथयात्रा काढण्यात येणार आहे. ही रथयात्रा नऊ दिवस चालेल आणि 5 जुलै 2025 रोजी हा सोहळा संपेल. पौराणिक मान्यतेनुसार, एकदा भगवान जगन्नाथांची बहीण सुभद्रा यांनी पुरी शहराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांनी त्यांना रथावर बसवून शहराभोवती फिरवले आणि वाटेत ते काही दिवस त्यांच्या मावशीच्या घरी राहिले. तेव्हापासून दरवर्षी रथयात्रेच्या स्वरूपात हा सोहळा साजरा करण्यात येतो.

संपूर्ण रथयात्रेत एकूण तीन रथ असतात. भगवान जगन्नाथांच्या रथाचे नाव नंदीघोष आहे. बलभद्रांच्या रथाचे नाव तलध्वज आहे आणि सुभद्रांच्या रथाचे नाव दर्पदलन आहे. हे रथ खास कडुलिंबाच्या लाकडापासून बनवले जातात. सर्वात खास गोष्ट म्हणजे रथ बनवण्यासाठी कोणतेही खिळे, काटे किंवा धातू वापरले जात नाहीत. रथाचे बांधकाम दरवर्षी अक्षय्य तृतीयेपासून सुरू होते. यात्रेदरम्यान, बलरामजींचा रथ पुढे फिरतो, त्यानंतर बहीण सुभद्राचा रथ आणि मागे भगवान जगन्नाथांचा रथ असतो.

रथयात्रेत सहभागी झाल्याने हजार यज्ञांइतके पुण्य मिळते असे मानले जाते. या यात्रेत सहभागी झाल्याने पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात. पुरीचे जगन्नाथ मंदिर हे चार धामांपैकी एक आहे आणि ही यात्रा भक्तांना मोक्ष मिळवून देते असे मानले जाते.