
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, सरकारने वकील उपलब्ध करून द्यावा. ते म्हणाले की, पोलिसांनी ज्योतीची डायरी काढून घेतली आहे. वडिलांनी सांगितले की, ज्योती त्या डायरीत काय लिहायची हे त्यांना माहित नव्हते. ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा म्हणाले, “ज्योतीला पोलिसांनी संशयाच्या आधारे अटक केली आहे. तिला उद्या न्यायालयात हजर केले जाईल. माझ्याकडे वकील ठेवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. मी सरकारला आम्हाला वकील उपलब्ध करून देण्याची विनंती करतो.”
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना ज्योतीच्या वडिलांनी सांगितले की, मला सरकारी वकील ठेवायचा आहे. मी गरीब आहे. जर सरकारने मला वकील दिला तर मी खूप आभारी राहीन. पोलिसांकडे ज्योतीचे सर्व फोन आहेत. ज्योती डायरीत काय लिहायची याबद्दल हरीश मल्होत्रा म्हणाले, “तिने औषधे एका स्लिपवर लिहून ठेवली होती. ती माझ्या मोठ्या भावाची पप्पूची औषधे होती. पोलिसांनी एक डायरी काढून घेतली आहे, मला माहित नाही की, ती त्यात काय लिहित होती.”
वडिलांनी ज्योतीबद्दल सांगितले की, कधीकधी ती कुठेतरी गेल्यानंतर फक्त एक दिवस परत येत असे. नाहीतर ती तीन-चार दिवसांनी यायची. ती नेहमी म्हणायची, ‘मी दिल्लीला जात आहे. माझ्याकडे एक छोटा फोन आहे, मी (व्हिडिओ) पाहत नाही.”
ज्योतीवरील आरोपांवर तिचे वडील म्हणाले, “आता मी याबद्दल काय बोलू?” उद्या तुम्ही कोर्टात जाल का, या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, मी आजारी आहे. मी कोर्टात जाऊ शकत नाही. ना कोणी माझा नातेवाईक आहे, ना कोणी माझा शेजारी आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून माझी तब्येतही बिघडली आहे.