‘शक्ती’ कायद्याच्या मंजुरीसाठी, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने ‘शक्ती’ कायदा करून पेंद्र सरकारकडे पाठवला; पण पेंद्राने अजून यावर निर्णय घेतलाल नाही. शक्ती कायद्याची आवश्यकता लक्षात घेऊन हा कायदा लवकर लागू करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (शरदचंद्र पवार गट) उद्या मंगळवारी सकाळी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाजवळ सकाळी साडेदहा वाजता काळय़ा फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.

बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर अत्याचार झाला. त्यानंतर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेले आंदोलनकर्ते हे आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते, मात्र सध्याच्या कायद्यात फाशी देण्याची तरतूद नाही; पण आरोपीला लवकरात लवकर फाशी देता येईल अशा पद्धतीचा कायदा आमचे सरकार असताना आम्ही आणला होता. सर्वपक्षीय 21 आमदार, वरिष्ठ सचिव, स्त्राrविषयक काम करणारे कार्यकर्ते यांनी अभ्यास करून शक्ती कायदा तयार केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली. त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषदेतही हे विधेयक संमत झाले. त्यानंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात व्हावे यासाठी हा कायदा आम्ही पेंद्र सरकारला पाठवला, पण अजूनही पेंद्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पेंद्राकडे या कायद्याचे प्रारुप धूळ खात पडले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली.

शक्ती कायदा मंजूर व्हावा यासाठी आपण पेंद्र सरकार आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विनंती केली असल्याचेही त्यांनी सांगितले. शक्ती कायदा राज्यात लागू झाला तर दोषीला फाशी देता येईल आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसेल, असेही देशमुख यावेळी म्हणाले.