
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज जिह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, दिवसभर किरकोळ रिपरिप वगळता पावसाने उसंत घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान, पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांतून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मात्र संथगतीने वाढ सुरूच आहे. काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत पंचगंगा पाणीपातळीत सहा ते सात फुटांची वाढ झाली. दुपारी बाराच्या सुमारास 26 फुटांवर असलेली पाणीपातळी सायंकाळपर्यंत स्थिर होती. तर काल रात्री 19 बंधारे पाण्याखाली गेले होते. आज दुपारपर्यंत दोन बंधाऱयांवरील पाणी ओसरल्याचे दिसून आले.