राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे, संजय राऊत यांची टीका

एकनाथ शिंदे जर त्या गाडीला बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजातून मी कशी उडी मारेन हे पाहतील. तसेच या राज्य सरकारची गाडी खिळखिळी झाली आहे असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे हे आपण कायम सांगतोय. पण युनाटेड नेशन्सने एका समितीचे उपाअध्यक्षपद पाकिस्तानकडे देत आहे. याचा अर्थ गेल्या 10 वर्षात आपले परराष्ट्र धोरण फसलं आहे. या साठी सर्वात आधी जयशंकर यांनी राजीनामा घेतला पाहिजे. संपूर्ण जगात हिंदुस्थानला कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले जात आहे आणि त्यासाठी हे सरकार जबाबदार आहे. राहुल गांधींनी सांगितले आहे की हे सरेंडर आहे. तसेच भाजपचे नेते आपल्याच देशाला आणि देशवासियांना घाबरतात. हे लोक लोकशाहीला घाबरतात असेही संजय राऊत म्हणाले.

राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे. एकनाथ शिंदे जर त्या गाडीला बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजातून मी कशी उडी मारेन हे पाहतील असे संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस विचार करतील यांना ढकलून मी सगळी गाडी कशी ताब्यात घेईन? आणि या दोघांनी उडी मारल्यानंतर आपण कसे ड्रायव्हिंग सीटवर बसू असा विचार अजित पवार करत आहेत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.