
शांताबाई बळीराम शिंदे यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुलगे-सुना, चार मुली-जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक ‘सामना’तील संगणक विभागप्रमुख सुषमा शिंदे यांच्या त्या सासू होत्या. त्यांच्या पार्थिवावर पनवेल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी 20 मे रोजी होणार असून बारावे 22 मे रोजी पनवेल येथील त्यांच्या निवासस्थानी करण्यात येणार आहे.