
मराठी भाषेतील अर्जांऐवजी गुजरातमधून आणलेल्या गुजराती अर्जांचा वापर एलआयसीच्या पॉलिसी उतरवण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार मुंबईत कांदिवलीत उघडकीस आल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी हा अक्षम्य गलथानपणा करणाऱया अधिकाऱ्यांना जाब विचारतानाच त्यांच्याच हस्ते ते गुजराती अर्ज फाडून फेकून दिले.
यावेळी स्थानीय लोकाधिकार समितीचे शरद नानल, अनंत वाळके, संजय सावंत, प्रशांत सावंत, सतीश सावंत, प्रशांत वाणी, सुभाष शेलार, मंगेश घाडीगावकर, विजय कविसकर, श्रीकांत तोंडवळकर, शशी चव्हाण, सुधीर राणे, दत्ताराम तळेकर, राजेश कदम, संतोष राउत, संतोष केवल, सतीश शिंदे, संतोष वाघ, सुहास सावंत, मोरे, पूजा देसाई, एकता परब, मुग्धा राणे, हेमांगी सोमथनकर आदी उपस्थित होते. सरकारी आदेशानुसार त्रिभाषा सूत्री नियमानुसार नवीन अर्ज छापून ते वापरले जातील, असे आश्वासन यावेळी एसआयसीच्या आस्थापनेकडून देण्यात आले.
– ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच शिवसेनेच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष गोपाळ शेलार, सरचिटणीस महेश लाड आणि पदाधिकाऱयांनी मुंबई विभाग कार्यालयाच्या वरिष्ठ मंडल प्रबंधक प्रीथा फिलिप यांना घेराव घातला. गुजराती अर्जांची मुंबईकरांवर जबरदस्ती का, असा जाब त्यांनी विचारला. शाखा प्रबंधक दिलीप शिंदे आणि संजय श्रीवास्तव यांच्या गलथानपणामुळे हे गुजराती अर्ज मुंबईत आणले गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याच हस्ते शिवसैनिकांनी ते अर्ज फाडून फेकायला लावले.