Air India Plane Crash – ‘टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक 1 कोटीची मदत

एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमधील मेघानी भागात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. अद्याप याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना टाटा ग्रृपकडून प्रत्येकी एक कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. टाटा ग्रृपकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे. तसेच जखमींचा खर्च देखील टाटा ग्रुपकडून करण्यात येणार आहे.

एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान अहमदाबादमध्ये कोसळले. हे विमान लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे मार्गस्थ झाले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळवरून उड्डान घेतलेले हे विमान उड्डाणानंतर काही क्षणातच मेघानीनगर भागातील डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. या विमानामध्ये 230 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर होते. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या सह 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

हे विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणार होते. दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी हे विमान कोसळले. या विमानामध्ये क्रू मेंबरसर 242 प्रवासी होते. यापैकी 169 जण हिंदुस्थानी होते, तर 53 जण ब्रिटिश नागरीक होते. 7 जण पोर्तुगालचे आणि 1 जण कॅनडाचा नागरीक होता.