
मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांबरोबरच रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्नही मोठा आहे. अनेकदा एखाद्या गुह्यात वापरलेल्या गाडय़ा किंवा जुन्या झालेल्या गाडय़ा रस्त्यावर सोडून दिल्या जातात. अशा बेवारस वाहनांमुळे रस्त्यावर अतिक्रमण होतेच, पण वाहतूककाsंडीही होते. तसेच वाहने उभी केलेल्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कचरादेखील साचतो. रस्त्यावरील ही बेवारस वाहने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलने खात्याद्वारे मुंबई महापालिका अधिनियम कलम 314 नुसार जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.