अकरावी प्रवेशासाठी 5 जूनपर्यंत मुदतवाढ

राज्यभरात अकरावी ऑनलाइन प्रवेशास ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत अर्ज करता येणार होते. मात्र हजारो विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरला नसल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दहावीचा निकाल लागल्यानंतर 26 मेपासून विद्यार्थ्यांना अकरावीसाठी अर्ज करता येत आहेत. मात्र राज्य शासनाने नुकताच इन हाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोटा यात बदल केल्यामुळे मुदतवाढ देण्यात आल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले.