
पंतप्रधान मोदींनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानने फक्त माणुसकीवर हल्ला केलेला नाही तर कश्मीरच्या अस्मितेवरही हल्ला केला आहे. हिंदुस्थानात अशांतता आणि दंगली भडकवण्याची पाकिस्तानची इच्छा होती. पाकिस्तानला जम्मू कश्मीरमधील पर्यटन व्यवसायावर हल्ला करायचा आहे त्यामुळे इथल्या गोर गरीबांच्या पोटावर पाय आला असता. दहशतवाद्यांनी आदिल नावाच्या एका स्थानिक तरुणाचाही खून केला आहे. याचा अर्थ दहशतवाद्यांनी फक्त निर्दोष व्यक्तींना लक्ष्य केले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की आज 6 तारीख आहे. सहा मे रोजी आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. आता जेव्हा पण पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरच नाव ऐकेल तेव्हा त्यांना हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल. त्यांनी कधी विचारही केला नव्हता की हिंदुस्थान त्यांना घुसून मारेल. हिंदुस्थानच्या या कारवाईमुळे पाकिस्तान आतून हलला आहे आणि त्यांनी जम्मू कश्मीरच्या सामान्य माणसांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तान कशा प्रकारे मंदिर, मशीद आणि शाळांवर गोळीबार करतो हे संपूर्ण जगाने पाहिल्याचे मोदींनी सांगितले.