भाज्या कडाडल्या… महागाईने जगणे मुश्किल केले!

महागाईने किचनचे बजेट कोलमडले असून सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यातच पावसामुळे तब्बल 40 टक्के शेतमाल खराब झाला असून बाजारातील भाजीपाल्याची आवक प्रचंड घटली आहे. त्याचा मोठा फटका सामान्यांना बसत असून रोज भाज्यांचे दर वाढत आहेत. हिरवा वाटाणा, शिमला मिरची, कोबी, वांगी या भाज्यांनी तर शंभरी पार केली असून 100 रुपये किलो मिळणारा हिरवा वाटाणा आज तब्बल 140 वर गेला.

हिरवे वाटाणे

आधी 100
आता 140

शिमला मिरची

आधी 60
आता 120

फ्लॉवर

आधी 60
आता 100

मेथी जुडी

आधी 20
आता 60

कोबी

आधी 80
आता 120

वांगी

आधी 80
आता 120

कारले

आधी 60
आता 80