
गेले तीन दिवस सुरू असलेल्य मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. राजापूरातील अर्जुना नदी आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकात शिरले असून राजापूर बाजारपेठ जलमय झाली आहे. पुराचे पाणी दुकानात शिरल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जगबुडी नदी, शास्त्री नदी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलाडल्यामुळे जिल्ह्यात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे राजापूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.जवाहर चौकात आलेल्या पुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासांत राजापूर शहरात 118 मिमी पाऊस पडला आहे.