
संगमेश्वर तालुक्यातील माखजन करजुवे या मुख्य रहदारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळली असून हा मार्ग अतिशय धोकादायक बनलेला आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना या मार्गावरून जाताना कसरत करावी लागली आहे.
धामापूर, वेसवीवाडी ,धनावडेवाडी आधी ठिकाणी बाजूच्या डोंगराचा भाग रस्त्यावर आल्याने एसटीसह खाजगी वाहनांना यातून मार्ग काढत पुढे जावे लागत आहे. तसेच या मार्गाची दुतर्फा नालेसफाई व खोदायी न झाल्यामुळे पडणारे पाणी थेट रस्त्यावरूनच वाहत आहे. तसेच या मार्गावर अनेक झाडे रस्त्यावरती वाकले असून केव्हाही रस्त्यावर आडवी पडून हा मार्ग बंद होऊ शकेल असे ग्रामस्थां कडून सांगण्यात येत आहे.
सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामध्ये पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज न आल्यास अपघातास निमंत्रण मिळू शकते. अनेक महिन्या पासून या मार्गाची डागडुजी व दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे .सध्या बांधकाम विभाग ठेकेदाराचे यांचे पूर्ण या मार्गाने दुर्लक्ष झाल्याने या मार्गाची दुरावस्था झाल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरात मुसळधार पाऊस पडत असतो मात्र बांधकाम विभागाचा एक ही अधिकारी पूर्व पाहणी करण्यासाठी फिरकला नसल्यानेच हा मार्ग अधिक धोकादायक बनला असावा का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरवली ते करजुवे या मार्गाची कोणत्याही प्रकारे नालेसफाई व खोदाई बांधकाम विभाग व ठेकदार यांनी केली नसल्यामुळे सध्या ग्रामस्था सह विद्यार्थी वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. बांधकाम विभागाने तात्काळ या मार्गाची दुरुस्ती करून हा मार्ग सुलभ करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने अधिकारी वर्गाला जाब विचारू.
– बाबू मोरे, सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना शाखा प्रमुख मावळंगे