अमित शहा म्हणतात देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःचीच लाज वाटेल

भारतीय भाषा ही आपली ओळख आहे. त्याचा अभिमान बाळगा. देशात इंग्रजीतून संवाद साधणाऱयांना स्वतःचीच लाज वाटेल असा समाज लवकरच तयार होईल. ही लढाई कठीण आहे, पण भारतीय समाज ती जिंकेल आणि पुन्हा एकदा स्वाभिमानाने आपला देश आपल्याच भाषांमध्ये चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री यांच्या ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शहा बोलत होते.

प्रशासनात सहानुभूतीची गरज

– आजही ब्रिटिशकालीन मानसिकतेतून तयार झालेली व्यवस्था सहानुभूतीचा अभाव बाळगते. प्रशासक जर सहानुभूतीशिवाय निर्णय घेत असेल तर तो प्रशासनाचा खरा उद्देश साध्य करू शकत नाही.

– जेव्हा देश अंधारात होता तेव्हा साहित्याने धर्म, स्वातंत्र्य आणि संस्कृतीची ज्योत तेवत ठेवली. सत्तांमध्ये बदल झाले, पण जेव्हा जेव्हा साहित्याला दडपण्याचा प्रयत्न झाला तेव्हा समाजाने संघर्ष केला.