Rain Update : मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई, ठाण्यासह कोकण, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडय़ात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मागील दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागणार असल्याचे भाकीत करीत हवामान खात्याने वेगवेगळे अलर्ट जारी केले आहेत. सध्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्या पावसाचा पुढील पाच दिवसांत जोर वाढणार आहे. हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाडय़ातील काही जिह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार. संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट दिला आहे.