
मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत केवळ 6 जणांना कोरोनाची लागण झाली. मात्र, कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या केरळनंतर सर्वाधिक आहे. राज्यात आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे. यात वृद्ध नागरिकांची तसेच सहव्याधी असलेल्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. राज्यभरात आतापर्यंत 29 हजार 317 कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 2 हजार 488 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 2 हजार 332 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 56 टक्क्यांवरून आता 94 टक्क्यांवर पोहोचले आहे.