
देशातील 16 वी जनगणना जातीय गणनेसह 2027 मध्ये केली जाणार आहे. 1 एप्रिलपासून पहिला टप्पा सुरू होणार आहे. लडाख, जम्मू आणि कश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये 1 ऑक्टोबर 2026 रोजी तर देशातील उर्वरित भागात 2027 मध्ये जणगणना केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक घराची निवासी स्थिती, मालमत्ता आणि सुविधांबद्दल माहिती गोळा केली जाणार आहे.