
गेला महिनाभर मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलावाचा पाणीसाठी वाढला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतले तलाव 40 टक्के भरले आहेत. मुंबई लागणाऱ्या पाण्याची एकूण क्षमता ही 14.47 लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यापैकी त्यापैकी 5,82,175 दशलक्ष लिटर पाणी मुंबईच्या तलांवात साठले आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मुंबईच्या काही तलावातील पाणीपातळी चांगलीच वाढ झाली आहे. मुंबईला सर्वाधिक पाणी भातसा तलावातून येतं या तलावात सध्या 2,44,439 दशलक्ष लिटर पाणी साठले आहे. भातसा तलावात सध्या 34.08 टक्के भरलेला आहे.
ठाणे जिल्ह्यातील तानसा आणि मध्य वैतरणा तलावांमध्येही समाधानकारक वाढ झाली आहे. तानसा तलावात 61,707 दशलक्ष लिटर साठा असून, हा तलाव हे 42.53 टक्के भरला आहे. तसेच मध्य वैतरणा तलाव 43.28 टक्के भरला आहे. अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर आणि मध्य वैतरणा या चार तलावांतील एकूण पाण्याचा साठा आता 3,22,906 दशलक्ष लिटर झाला आहे.
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
—
🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today.#MumbaiRains#MyBMCUpdates pic.twitter.com/YmIaeqWMPB— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 30, 2025