
राज्य लोकसेवा आयोगामार्फत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले आहेत. आता एका प्रश्नासाठी पाच पर्याय उमेदवारांना दिले जाणार आहेत. यापैकी कोणताही एका पर्यायाचे वर्तुळ रंगविणे बंधनकारक असेल. असे न केल्यास प्रत्येक उत्तरासाठी 25 टक्के गुण कापले जाणार आहेत. 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू असतील. ‘एमपीएससी’ मार्फत याबाबतची सूचना जाहीर करण्यात आली आहे. आयोगामार्फत उत्तरपत्रिका दोन भागांत विभागण्यात आली आहे. भाग 1 आणि भाग 2 अशी ही उत्तरपत्रिका असेल. भाग 1 हा केवळ प्रश्नांची उत्तरे नोंदविण्यासाठी असून, भाग 2 मध्ये उमेदवाराच्या नावासह बैठक क्रमांक, विषय, सांकेतांक प्रश्नपत्रिका क्रमांक तसेच स्वाक्षरी असा तपशील असणार आहे.




























































