
अकोल्यात जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजेच डीपीडीसीच्या बैठकीत मोठा राडा झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांनी 29 कोटींचा निधी परत गेल्याच्या मुद्द्यावरून आवाज उठवला. यावरून वाद झाल्याने बैठकीत मोठा गोंधळ उडाला. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले.
शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी 29 कोटींच्या निधीचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे बैठकीत उपस्थित भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांना हा मुद्दा झोंबला. यामुळे वाद वाढून दोन्ही आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि मोठा गोंधळ उडाला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
अकोल्यात नियोजन भवन येथे ही डीपीडीसीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार नितीन देशमुख आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. यावेळी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. वातारण तापल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना शांत केले.