महायुतीच्या नेत्यांनी एकनिष्ठेचे धडे देऊ नयेत – बच्चू कडू

कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहावे मात्र नेत्यांनी निष्ठा विकावी, असे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे. पक्ष फोडून तयार झालेल्या महायुतीच्या नेत्यांनी एकनिष्ठतेचे धडे देणे योग्य नाही. केवळ सत्तेसाठी एकमेकांच्या जागेवर आपापले उमेदवार देणे हे जनतेने सहन करू नये, असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले. नेवासा येथे भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे घेतलेल्या निर्धार मेळाव्यात बोलताना बच्चू कडू म्हणाले, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना सर्व अनुकूल असताना आणि त्यांनी एकनिष्ठपणे काम करूनही पक्षाने त्यांचा घात केला. तरीही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.