
कॅबिनेट सचिवालयाने मंत्रालयांना प्रमुख प्रस्तावित सुधारणांवर त्यांच्या सूचना, निरीक्षणे आणि टिपणे सादर करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ‘पीटीआय’ला (PTI) दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, पुढील दशकासाठी त्यांच्या सुधारणांच्या प्रमुख तीन प्राथमिकतांमध्ये निरंतर संरचनात्मक सुधारणा, नाविन्याचा (Innovation) सखोल विस्तार आणि प्रशासनाचे अधिक सुलभीकरण यांचा समावेश असेल. आता कॅबिनेट सचिवालयाने मंत्रालयांना प्रमुख प्रस्तावित सुधारणांवर टिपणे सादर करण्यास सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट सचिवालयाने सर्व मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना, त्यांच्या संबंधित कार्यालयांद्वारे हाती घेण्याचा प्रस्तावित असलेल्या प्रमुख सुधारणांची रूपरेषा मांडणारी संक्षिप्त टिपणे (Notes) सादर करण्यास सांगितले आहे.
या मंत्रालये आणि विभागांनी ही टिपणे आणि सूचना १७ मार्चपर्यंत सचिवालयाकडे सादर करणे आवश्यक आहे, असेही सचिवालयाने स्पष्ट केले आहे. सचिवालयाने सर्व मंत्रालयांना अंमलात आणलेल्या तसेच भविष्यात हाती घेण्याचा प्रस्तावित असलेल्या प्रमुख सुधारणांविषयीची टिपणे सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे.
देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांचे ‘जीवनमान सुलभ’ (Ease of Living) करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सरकारची “सुधारणा एक्सप्रेस” (Reform Express) सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून देत असल्याचा दावा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पुढील दशकासाठी त्यांच्या सुधारणांच्या प्रमुख तीन प्राथमिकतांमध्ये निरंतर संरचनात्मक सुधारणा, नाविन्याचा सखोल विस्तार आणि प्रशासनाचे अधिक सुलभीकरण यांचा समावेश असेल.
अलीकडच्या काळात सरकारने हाती घेतलेल्या प्रमुख उपाययोजनांमध्ये जीएसटीचे (वस्तू आणि सेवा कर) सुसूत्रीकरण, चार कामगार संहितांची (Labour Codes) अधिसूचना जारी करणे आणि थेट परकीय गुंतवणुकीचे (FDI) नियम शिथिल करणे यांचा समावेश होतो. आता सचिवालयांनी याबाबतची टिपणे मागवली आहेत.


























































